लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Thursday 10 November 2016

टेंभूचे पाणी अखेर विट्यात


३/११/२०१६

टेंभूचे पाणी अखेर विट्यात दाखल

विटा : विजय लाळे 


Sunday 18 September 2016

टेंभू चा पहिला ठिबक आणि मीटर यशस्वी प्रयोग जुनोनी (जि. सोलापूर) तलावावर .

टेंभू चा पहिला ठिबक आणि मीटर यशस्वी प्रयोग जुनोनी (ता. सांगोला , जि. सोलापूर) तलावावर  .
महाराष्ट्रातील टेंभू उपसा सिंचन योजनेवरचा पहिला ठिबक आणि मीटर ने पाणी वाटून घेण्याचा यशस्वी प्रयोग जुनोनी (ता. सांगोला , जि. सोलापूर) येथे तलावावर केला आहे. पाट बंधारे विभागाचे अधिकारी लक्ष्मण केंगार (शाखा अभियंता, बुध्दीहाळ तलाव), कालवा निरीक्षक भारत होनमाने, बिरदेव पाणी वापर सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल बापू होनमाने आणि त्या संस्थेचे १२२ सभासद यांनी हा प्रयोग निर्विवाद यशस्वी करून दाखवला आहे. तेथील आमदार गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने , अधिकाऱ्याच्या पारदर्शी कामामुळे आणि शेतकऱ्यांच्या परस्पर विश्वासाने जुनोनी येथे संपूर्ण महाराष्ट्रातला समन्यायी पाणी वाटपाचे धोरण अतिशय काटेकोरपाने राबविले जात आहे. जेवढे पाणी वापरले तेव

ढेच बिल भरायचे त्यामुळे कोणी कितीही पाणी वापरले तरी भांडणे,  कटकटी होत नाहीत. 

Friday 2 September 2016

पाणी एकच दिवस सोडून केली दुष्काळी भागाची फसवणूक - बाबासाहेब मुळीक

टेंभू योजनेचे पाणी एकच दिवस सोडून केली दुष्काळी भागाची फसवणूक - बाबासाहेब मुळीक यांचा आरोप 
दि. ०१/०९/२०१६

Monday 29 August 2016

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस:    डॉ . राजेंद्र सिंह राणा, एक माणूस बोगस  डॉ . राजेंद्र सिंह राणा हा माणूस आंतर राष्ट्रीय जल तज्ञ , पाणी वाला बाबा किंवा नदी पुन...

Sunday 10 July 2016

घाणंद कालवा ढासळू लागला

घाणंद कालवा ढासळू लागला
टेंभू योजनेचा 70 ते 80 फूट खोलीचा माहुली ते घाणंद एक्स्प्रेस कालवा दिवसेंदिवस ढासळत आहे. हा कालवा 15 वर्षांपूर्वी खोदला आहे. आता अस्तरीकरणावरच्या बाजूला तातडीने गनायटिंग करून घेतले पाहिजे, अन्यथा पुढच्या दोन वर्षात कालवा ढासळण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे.
टेंभू योजनेमध्ये खानापूर तालुक्यातून आटपाडी तालुक्याकडे पाणी वाहून नेण्यासाठी माहुली पंपगृहातून घाणंद तलावाकडे हा एक्स्प्रेस कालवा आहे. हा उघडा कालवा असून त्याची खोली 70 ते 80 फुटाहून अधिक आहे. दावल मलिकच्या डोंगर रांगाच्या दक्षिणेला वेजेगाव, देविखिंडी, भिकवडी गावच्या हद्दीतून पुढे हा कालवा देविखिंडी बोगद्यातून पुढे घरनिकी गावच्या शीवेवर खाली उतरतो. एकूण 19 किलोमीटर अंतराच्या या कालव्याला 8 किलोमीटर बोगदा आहे. माहुलीपासून निघाल्यानंतर देविखिंडी बोगद्यापर्यंत येईपयर्ंत शासनाच्या नियमानुसार प्रत्येक 2.5 किलोमीटरला 1 मीटर डहाळ (म्हणजेच सरकारी भाषेत 2500 मीटरला 1 मीटर प्रमाणे उतार) देणे आवश्यक असताना प्रत्यक्षात 1 किलोमीटरला 1 मीटर इतका तीव्र उतार देण्यात आला आहे.
परिणामी कालवा इतका खोल आहे की, योजनेच्या एकूण रकमेपैकी एक चतुर्थांश इतकी प्रचंड मोठी रक्कम खर्ची केवळ खोलीकरण आणि अस्तरीकरण म्हणजेच लाईनिंग या कामांसाठी पडली आहे. शिवाय आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावाच्या परिसरात आणखी किमान 4 मीटरवरच्या परिघाला पाणी देता आले असते. परंतु त्याचा विचारच योजनेचा आराखडा करताना केला गेलेला नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने यांची दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांंकडून होत आहे.
तातडीने उपाय गरजेचे
सध्या कालव्यावरील दरड कोसळून आत पडत आहे. ऊन, वारा , पाऊस यामुळे एकसंघ असणारे दगड दिवसेंदिवस सुटे होत आहेत. याबाबत कालव्याच्या अस्तरीकरणाच्या वर तातडीने गनायटींग म्हणजेच सिमेंट आणि वाळूचा प्रेशर देऊन गिलावा न केल्यास येत्या एक दोन वर्षातच कालव्यावरचा भाग ढासळून आत पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील कालव्याचे नुकसान होणार आहे .

भिकवडीला टेंभूचे पाणी मिळू शकते


भिकवडीला टेंभूचे पाणी मिळू शकते

सध्या लाभक्षेत्राबाहेर असलेल्या भिकवडी (ता.खानापूर) आणि परिसराला टेंभूचे पाणी मिळण्यासाठी माहूली टप्पा क्र.3 अ मधून पाणी देता येवू शकते, असे अभ्यासांती मत खानापूर तालुका टेंभू योजना कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथक यांनी व्यक्त केले आहे.
टेंभू योजनेच्या सध्याच्या आराखड्यातून अनेक गावे लाभक्षेत्रा च्या बाहेर राहिली आहेत. या गावांना टेंभू पाणी कसे देता येईल, याबाबत सामान्य जनता, लोकप्रतिनिधी, शासनाचे आधिकारी आणि विविध स्तरांवर चर्चा, माहिती आणि अभ्यास अशा पातळ्यांव्दारे तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.  त्यात खानापूर तालुका कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथक आपल्या परीने योगदान देत विविध पर्याय सुचवित आहेत. सध्याच्या नियोजनानुसार टेंभूचे पाणी भिकवडी या गावाला मिळत नाही.त्यावर उपाय म्हणून दोन प्रकारे पर्याय सुचवण्यात आले आहेत.
टेंभू योजनेच्या माहूली पंपगृहाच्या बरोब्बर ईशान्य दिशेला भिकवडी हे गाव आहे. या गावाचा आणि परिसराचा तब्बल 1 हजार 457 .86 हेक्टर म्हणजे 3 हजार 600 एकर इतका भाग या योजनेपासून वंचित राहिलेला आहे. या भागाला टेंभूचे पाणी मिळण्या साठी नेमके काय करता येईल? याबाबत खानापूर तालुका टेंभू योजना कृती समिती आणि बारमाही माणगंगा अभ्यास पथकाने जी.पी.एस. यंत्र आणि टोपोशिटस् घेवून प्रत्यक्ष त्या भागात फि रून पाहणी केली.   यांत कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.बाबासाहेब मुळीक, जिल्हा परिषद सदस्य किसनराव जानकर, बारमाही पथकाचे कार्याध्यक्ष, निवृत्त अभियंता डी.डी.पवार आणि संभाजी मोरे यांचा समावेश होता.
त्यांनी मांडलेल्या पर्यायानुसार माहूली पंपगृहातून पाणी उचलून टप्पा क्रमांक 3 अ चा घाणंद एक्स्प्रेस कालवा जिथे सुरू होतोे तिथून भिकवडी गावच्या पूर्वेला असणार्‍या पळस पाझर तलावात नैसर्गिक उताराने पाणी जावू शकते. माहूली पंपागृहाच्या पुढे वलखड गावाजवळ घाणंद कालवा सुरू होतो तिथे कालव्याची समुद्र सपाटी पासूनची उंची 740 मीटर इतकी आहे तर पळस पाझर तलावाची उंची 735 मीटर आहे. हे अंतर जास्तीत जास्त 5 ते 6 किलोमीटर इतके आहे. त्यामुळे या कालव्याच्या तोंडालाच विमोचक (गेट) करून बंदिस्त पाईपलाईन व्दारे अगर उघड्या कालव्यातून पाणी भिकवडी हद्दीतील तलावात तब्बल 5 मीटर उताराने आरामात जावू शकते.
तसेच त्या ठिकाणी इतका मोठा उतार येत असल्याने बंद पाईप लाईन अगर कालवा जादा खोल (डिप कट) करण्याचीही गरज नाही. शिवाय जिथून हा कालवा अगर बंद पाईप जाणार आहे ती सर्व जागा वनविभागाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची आहे, त्यामुळे भू संपादन करणे, नुकसान भरपाई देणे वगैरे गोष्टींचा संबंधही उरत नाही. परिणामी भिकवडी गावच्या माथ्यावर असलेल्या पळस पाझर तलावात पाणी आल्यानंतर त्या खालील पळस ओढ्यातून पुढे पाणी संपूर्ण गाव आणि परिसराला जावू शकेल.
यांत आणखी एक पर्याय सुचविण्यात येत आहे, जर उघडा कालवा अगर बंद पाईप यांचे अंतर कमी करायचे असेल तर वलखड हद्दीच्या पुढे याच घाणंद कालव्याच्या किलोमीटर क्रमांक 2 ते 3 या दरम्यानच्या वळण असलेल्या ठिकाणी एक विमोचक करून पाणी पुढे पळस ओढ्यात सोडता येवू शकते. हे पाणीही नैसर्गिक उताराने जावू शकते. घाणंद कालवा ते पळस ओढा हे अंतर केवळ एक ते दीड किलोमीटर इतकेच आहे. त्यामुळे या दोन्ही पर्यायाबाबत शासनाच्या अधिकार्‍यांनी तातडीने सर्व्हेक्षण करून सकारात्मक विचार केल्यास आज पर्यंत लाभक्षेत्रापासून वंचित राहिलेले भिकवडी हे गाव टेंभूच्या कार्यक्षेत्रात येवू शकेल.





Sunday 19 June 2016

टेंभूचा येरळा जलसेतू खचण्याचा धोका

टेंभूचा येरळा जलसेतू खचण्याचा धोका
ता. १६/०६/२०१६
येरळेच्या पात्रातील काटेरी झाडे जेसीबीने उखडण्यात येत आहेत. त्यामुळे टेंभू योजनेच्या जलसेतूला खचण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत टेंभूच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. 

चितळी गावातून जाणार्‍या येरळा नदीच्या 500 मीटरच्या आडव्या पात्रावर टेंभू योजनेचा हा जलसेतू उभारलेला आहे. हा जलसेतू 15 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. सध्या या जलसेतूच्या एकूणच भवितव्याशी वाळू माफिया मंडळींचा खेळ सुरू आहे. गेल्या सात- आठ वर्षांपासून येरळेच्या पात्रातील वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. अलिकडच्या काळात तर वाळू माफियांची मजल पार जलसेतूच्या खालच्या स्तंभांना इजा पोहोचवण्यापर्यंत गेली आहे. चितळी हद्दीत अजस्त्र जेसीबी आणि पोकलँडच्या सहाय्याने हा वाळू उपसा सुरू आहे. वास्तविक जलसेतूच्या 150 ते 200 फुटाच्या दोन्ही बाजूंकडील अंतरात काहीही करता येत नाही. या जागेवर शासनाची मालकी असते. मात्र सध्या येरळे नदीच्या परिसरातील मोठ-मोठाली काटेरी बाभळीची झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. काही महाभागांनी पार जलसेतूच्या खालची झाडे जे वृक्ष म्हणण्याइतपत मोठे झाले आहेत ते जेसीबी सारख्या अजस्त्र यंत्रांच्या सहाय्याने मुळापासून उखडून टाकण्यात येत आहेत. परिणामी उद्या या वृक्ष उखडण्यामुळे तेथील वाळू उघडी होत आहे. या वाळूवर आता वाळू माफियांची नजर गेली आहे. परंतु या सगळ्यात पात्रातील जलसेतूच्या स्तंभांना खचण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. याबाबत चितळी आणि चिखलहोळ परिसरातील काही जागरूक लोकांनी आक्षेप घेतला तर त्यांनाच तुम्हाला काय करायचे आहे ? असे सुनावले जाते.

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने जागेवर जावून माहिती घेतली असता दोन, तीन जेसीबी यंत्रांच्याव्दारे पात्रातील मोठ-मोठी झाडे उखडण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. पश्‍चिमेच्या बाजूला कोळशाच्या भट्ट्या टाकल्या आहेत, त्या लोकांना पलिकडच्या काही शेतकर्‍यांनी झाडे तोडण्याचे कंत्राट दिल्याचे सांगण्यात आले. परंतु थेट जलसेतूच्या खालपर्यंत स्तंभाखालीच झाडे उखडण्याचे आणि वाळू उपसण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याबाबत आता टेंभूच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

टेंभू योजना आमचा प्रतिष्ठेचा प्रश्न : ना. विजय शिवतारे

टेंभू योजना आमचा प्रतिष्ठेचा प्रश्न : ना. विजय शिवतारे 
ता. १९/०६/२०१६

Tuesday 26 April 2016

टेंभू चे पाणी अग्रणीत सोडायचीच घाई का ? कशासाठी ?

खानापूर घाट माथ्याला टेंभू च्या ४ आणि ५ व्या टप्प्यांचा काय फायदा ?
जो पर्यंत कचरेवाडी आणि गोरेवाडी हे दोन कालवे पूर्ण होत नाहीत , 
तसेच  अद्याप टेंभू च्या लाभ क्षेत्रा बाहेर असलेली उर्वरित १८ गावे टेंभू योजनेत समाविष्ट होत नाहीत तो पर्यंत 
खानापूर घाट माथ्याला टेंभू च्या ४ आणि ५ व्या टप्प्यांचा काय फायदा ?
टेंभू चे पाणी अग्रणीत सोडायचीच घाई का ? कशासाठी ? हे आता सगळ्या लोकाना समजायला लागले आहे … 

Saturday 23 April 2016

राज्यातील अपूर्ण पाणी योजनांसाठी 50 हजार कोटींचे कर्ज - गिरीश महाजन

राज्यातील अपूर्ण पाणी योजनांसाठी 50 हजार कोटींचे कर्ज - गिरीश महाजन 
     अपूर्ण पाणी योजना पूर्ण करण्यासाठी प्रसंगी शासन 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढेल, मात्र पुढच्या दोन वर्षांत कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवू, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक 4 आणि 5 च्या उर्वरित कामांचा प्रारंभ शुक्रवारी ना. महाजन यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून बंद असलेली टेंभूची ही कामे आज आम्ही सुरू करीत आहोत. पाणी योजना अपूर्ण राहण्यास राज्याचे एकूण अंदाजपत्रकच कारणीभूत आहे. एक तर 7 ते 8 हजार कोटींपेक्षा जास्त या खात्याला निधी देता येत नाही आणि दुसरे म्हणजे राज्यांतर्गत असलेला अनुशेष; परंतु आता यावर मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि आम्ही मिळून मार्ग काढला आहे.
अनुशेषाचे काय या प्रश्‍नावर ना. महाजन म्हणाले, आता विदर्भातील वाशिम, अकोला, अमरावती आणि बुलडाणा या चारच जिल्ह्यांचा अनुशेष भरून काढायचा राहिला आहे. बाकीकडचा बहुतांश अनुशेष भरून निघाला आहे. अनुशेषाच्या बाबतीत राज्यपालांच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊ. त्यासाठी आवश्यकता असल्यास त्यांचेही मत घेऊ; परंतु येत्या दोन वर्षात सगळ्या अपूर्ण सिंचन योजना आम्ही पूर्ण करणार आहोत.
ते म्हणाले, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत यावर्षी महाराष्ट्रातील सात प्रकल्प समाविष्ट झाले आहेत. या प्रकल्पांना केंद्र सरकार 60 टक्के तर राज्य सरकार 40 टक्के निधी देणार आहे. त्याचा वाटा राज्याने काढून ठेवला आहे. त्याच वेळी जी रक्कम सरप्लस होईल ती पाणी योजनांसाठीच खर्च केली जाईल. या केंद्राच्या योजनेत पुढच्या वर्षी आणखी 13 प्रकल्पांचा समावेश करण्यात येईल.
टेंभू योजनेच्या नियेाजनाच्या चुका व वेजेगाव तलावाचा मुद्द्यावर मंत्री महाजन यांनी तत्काळ या सूचनेकडे गांभीर्याने पहा आणि ती दुरुस्त करून घ्या, असे अधिकार्‍यांना आदेश दिले तसेच खासदार संजय पाटील यांनीही हा मुद्दा बरोबर असून चुका दुरुस्त करून घेऊ, असे सांगितले. 
सांगलीतील पाणी लातूरकरांसाठी दिले मात्र सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळाकडे राज्य शासन गांभिर्याने पहात नाही असा आरोप केला जात आहे या आरोपाबाबत ते म्हणाले,तसे काही नाही. राज्य शासनाला सर्व जिल्हे सारखेच आहेत. दुजाभाव केलेला नाही आणि होणारही नाही.








Sunday 10 April 2016

सांगोला तालुक्यात शेती साठी तलावाचे पाणी मीटर पद्धतीने

सांगोला तालुक्यात शेती साठी तलावाचे पाणी मीटर 

पद्धतीने 


शेती ला मीटर लावून पाणी देणे , हा महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग 

दुष्काळी सांगोला तालुक्यात प्रथमच यशस्वी होत आहे . 


जुनोनी तलावावर १०० टक्के मीटर जोडून टेंभू योजनेचे पाणी शेतात 

नेले जात आहे . तेथील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन द्वारे शेतीला पाणी 

दिले जात आहे. 
सविस्तर वृत्त पहा दैनिक सामना , पुणे 
ता . २ एप्रिल २०१६

Monday 4 April 2016

भरण कालव्याचे ठिकाण बदलले तरच वेजेगाव तलाव पूर्ण भरू शकेल

टेंभू योेजनेची कामे गतीने -
 (विजय लाळे यांच्या ब्लॉग वर पहा टेंभू चे अपडेट्स ) ….
टेंभूच्या खानापूर - तासगाव कालव्याच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले तर पारे भागापर्यंत पाणी पोहोचेल. तसेच 4 थ्या टप्प्याच्या निविदा निघाल्या आहेत. लवकरच पंपगृहाच्या कामाला सुरूवात होईल. एकूणच खानापूर तालुक्यात टेंभू योेजनेची कामे गतीने सुरू आहेत.
खानापूर तालुक्यात सरत्या आठवड्याच्या सुरुवातीला करंज ओढ्यात पाणी सोडल्याने गार्डी, घानवड आणि हिंगणगादे गावांच्या परिसरापर्यंत पाणी पोहोचले आहे. माहुली पंपगृहातून तिसर्‍या ब टप्प्यातून हे पाणी खानापूर ते तासगाव कालव्यात सोडले होते. त्यातून भाग्यनगर तलावातही पाणी सोडण्यात आले. परंतु हा कालवा एकूण 41 किलोमीटर अंतराचा आहे. माहुली ते पारे गावच्या शिवेपयर्ंत हा कालवा आहे.
या अंतरातल्या विट्या जवळच्या बोगद्याचे काम अपूर्ण आहे. विटा - साळशिंगे रस्त्यावरील आयटीआय च्या टेकापलिकडून हा बोगदा सुरू होतो ते थेट शिवमल्हार हिल्स म्हणजे, सुळकाईच्या डोंगराच्या पायथ्याच्या कदम वस्तीपयर्र्ंत. एकूण उत्‍तर-दक्षिण असलेल्या या बोगद्याचे एकूण अंतर सव्वा दोन किलो मीटर अर्थात 2 हजार 270 मीटर इतके आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूंकडून गेल्या 6 वर्षांपासून कामे सुरू आहेत.
गेल्या दीड वर्षात गती घेतल्यांनतर आता आजअखेर एकूण 355 मीटरचे काम अपूर्ण आहे. हे काम 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन आमदार अनिलराव बाबर यांनी दिले आहे. यातल्या उत्‍तरेकडचे काम बर्‍यापैकी पूर्ण झाले आहे. परंतु दक्षिणेकडून आतल्या भागाचे काम सध्या दिवसामागे 2 ते 3 मीटर इतकेच होत आहे.
दक्षिणेकडून बोडरे वस्तीच्या अलिकडच्या भागातून जॅक सपकाळ यांच्या शेताजवळून हा बोगदा सुरू होतो. जवळपास 1 हजार 100 मीटर पर्यंतच्या पुढे आत काम झालेले आहे. आत पाणी आणि हवा पोहोचण्यासाठी स्वतंत्र पाईप्स टाकल्या असल्या तरी अत्यंत कोंदट, उष्ण असे वातावरण आहे. काही ठिकाणाहून पाण्याचे पाझर सुरू आहेत. त्यातच एकदा तीन ते चार जिलेटीनचे स्फोट घेतल्यानंतर आतला धूळ आणि तयार झालेला वायू बाहेर जाण्यासाठी (म्हणजेच मकींगसाठी) किमान 5 ते 6 तास लागत आहेत. त्यांनतर आतले उडालेले दगड, कपर्‍या बाहेर काढण्यात येतात.
वेजेगाव पंपगृह, टप्पा क्रमांक 4 च्या पंपगृहाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच वर्क ऑर्डर निघून कामे सुरू होतील. सुरुवातीला वेजेगाव तलाव भरून घेण्याचे नियोजन आहे, असे आमदार बाबर यांनी सांगितले आहे परंतु ज्या माहुली ते घाणंद मुख्य कालव्याला टप्पा क्रमांक 4 चा भरण कालवा जोडायचा आहे, त्या ठिकाणी मुख्य कालवा खाली आणि वेजेगाव तलाव वर अशी स्थिती आहे. त्यामुळे भरण कालव्याचे ठिकाण बदलले तरच वेजेगाव तलाव पूर्ण भरू शकेल, अन्यथा सध्याच्या नियोजनाप्रमाणे वेजेगाव तलावाच्या आग्‍नेय दिशेला असणार्‍या वरच्या बाजूकडील पंपगृहाकडे पाणी पोहोचू शकेल.

Sunday 3 April 2016

आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात आंदोलने



आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात हि काल टेंभू योजनेचे पाणी मिळावे म्हणून आंदोलने
पहिल्यांदा कडेगाव … 
येथील ल. पा. तलावात टेंभू चे पाणी सोडावे अशी लोकांची मागणी होती , सध्या या तलावात पाणी सोडण्याचे कसलेही नियोजन नसताना देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कडून चालू वर्षीच्या ऊस बिलातून या आवर्तनाचे पैसे कपात करून घेतले आहेत . पाणी पट्टी भरूनही आम्हाला पाणी का दिले जात नाही असा सवाल शेतकरी विचारत आहेत. आंदोलन झाल्या नंतर जल संपदा विभागाचे शाखा अभियंता दीपक निर्मळे  यांनी  सध्या कामथी (ता कराड) कालव्याचे रोटेशन सुरु आहे त्यानंतर गुढी पाडव्याला तुम्हाला पाणी देण्यात येईल असे उत्तर दिले आहे …. 
कडेगाव तालुक्याने टेंभू च्या पाण्याचा आतापर्यंत चिक्कार लाभ अगदी फुकट घेतला आहे , आताही केवळ दांड पणा करून माझे ते माझेच आणि दुसर्याचे ते हि माझेच असे धोरण सुरु ठेवले आहे … यां तालुक्याला सर्वात जास्त पाणी मिळाले आहे , पारंपारिक पिक पद्धती सोडून या तालुक्याने केवळ ऊस शेती सुरु केल्याने अमाप पाणी लागते. त्या मुळे सतत पाणी असूनही पाणी नाही म्हणून इथलेच  लोक बोंब ठोकतात …. पुढे पाणी चालले कि या मंडळींच्या पोटात दुखते कि काय कोणास ठाऊक ? आणि सर्वात कडी म्हणजे इथे सगळ्याच पक्ष्याचे सगळेच राजकीय पुढारी  पाणी पळवण्यात पटाईत आहेत असे एकूण चित्र आहे. 
आता आटपाडी च्या आंदोलनाविषयी -
श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन लॉंग मार्च नावाने आटपाडी ते कराड असे झाले…सांगोला , आटपाडी या शेपटा कडच्या भागा  अगोदर  खानापूर तालुक्यात भाग्य नगर तलाव आणि करंज ओढ्याला पाणी का सोडले ? असा जाब म्हणे मोर्चे करांनी कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे याना विचारला … खानापूर तालुक्याला दिलेले पाणी हा चोरीचा प्रकार आहे असे त्यांचे मत होते …. हे म्हणजे अति झाले … खानापूर तालुक्याला पाणी दिले ते हि फुकटात दिलेले नाही कोणीतरी (पैसे कोणी भरले त्यांची नावे पुढच्या वेळी नक्कीच जाहीर केली जातील ) पाणी पट्टी आधीच भरली नंतरच पाणी आलेले आहे … ते पाणी चाचणी साठी म्हणून करंज ओढ्यात सोडले आहे. भाग्यनगर चे आवर्तन नियम प्रमाणेच आहे… आणि हाच निकष लावायचा तर दोन वर्षांच्या पूर्वी आटपाडीत आलेले पाणी सुद्धां असेच नियम मोडून आले होते . तेंव्हा या  मंडळींनी उगाच आटपाडी करांना भूल थापा देवू नये. 

  टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , घडामोड , सर्वात आधी , 
अगदी निर्भीड, नि : ष्पक्ष …. सडेतोड वृत्ते, विश्लेषण आणि अभ्यास पूर्ण माहिती …
राहा अपडेट माझ्या बरोबर … पत्रकार विजय लाळे. 
फेसबुक पेज आणि ब्लॉग 

चितळी जवळ टेंभू चे दारच उखडले !

चितळी जवळ टेंभू चे दारच उखडले !


दैनिक पुढारी , ३/०३/२०१६

टेंभू योजनेची प्रत्येक बातमी , घडामोड , सर्वात आधी 

अगदी निर्भीड, नि : ष्पक्ष …. सडेतोड वृत्ते, विश्लेषण 

णि अभ्यास पूर्ण माहिती …

फेसबुक पेज Failure Of Tembhu Water Lifting 

Scheme https://www.facebook.com/Failure-

Of-Tembhu-Water-Lifting-Scheme-

570277833114360/info/?tab=page_info

आणि 

ब्लॉग http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

राहा अपडेट माझ्या बरोबर … पत्रकार विजय लाळे.

Saturday 2 April 2016

महाराष्ट्र सरकार ची कृष्णा खोरे बाबत सापत्न भूमिका - आमदार अनिलराव बाबर

महाराष्ट्र सरकार ची कृष्णा खोरे बाबत सापत्न भूमिका , करोडो रुपये विदर्भ , मराठ वाड्याला द्यायला आमची हरकत नाही पण आमच्या हक्काचे पैसे तरी आम्हाला द्या - आमदार अनिलराव बाबर  विधानसभेत आक्रमक 
Daily Pudhari 30/03/2016

टेंभू च्या कालवा दुरुस्तीचे काम घानवड जवळ पूर्ण -

























टेंभू च्या कालवा दुरुस्तीचे काम घानवड जवळ पूर्ण - हिंगणगादे  कडे आज पाणी सोडणार ; आमदार बाबर. 
आठ तासांत फोडलेला कालवा पूर्ववत केला ; टेंभू च्या अधिकाऱ्यांचे आभिनंदन  आणि आभार 

Friday 1 April 2016

घानवडच्या हद्दीत टेंभूचा कालवा फोडला

 घानवडच्या हद्दीत टेंभूचा कालवा फोडला. 

पंप बंद : गार्डीकरांचा आनंद २४ तासच टिकला : हिंगणगादेकरांचाही 

हिरमोड 

Daily Pudhari - 1 /04/2016.


टेंभू चे पाणी विट्यात १५ मे पर्यंत - आमदार बाबर



टेंभू चे पाणी विट्यात १५ मे पर्यंत : 


तर खानापूरचे लोक दिवाळीची अंघोळ टेंभू 

च्या  पाण्याने करतील - आमदार बाबर 
Daily Pudhari - 31 March 2016.

Tuesday 29 March 2016

जलयुक्त शिवार योजनेतला भ्रष्टाचार आणि गैर प्रकार

मित्रांनो , माझा आणखी एक अंदाज 

खरा होताना दिसतोय, 


लोकसत्ता पाठोपाठ आता सामना , 


जलयुक्त शिवार योजनेतला भ्रष्टाचार 

आणि गैर प्रकार लोकसत्ता पाठोपाठ 

सामना ने सुद्धा चिन्ता व्यक्त केली 

आहे… अग्रणी नदी पुनरज्जीवनाच्या 

कामांच्या बाबत मी जे आक्षेप घेतले,

तेच आता इथेही व्यक्त केले आहेत.

अग्रणी नदी पुनरज्जीवनाच्या कामांबाबत आक्षेप

मित्रांनो , माझा 

आणखी एक 

अंदाज खरा 

होताना 

दिसतोय, 

अग्रणी नदी 

पुनरज्जीवनाच्या 

कामांच्या बाबत मी जे आक्षेप घेतले,

तेच आता इथे तज्ञांनीही व्यक्त केले आहेत.
Daily Loksatta Dt. 28/03/2016

टेंभू चे पाणी अखेर २० वर्षांनी गार्डीत पोहोचले ….

टेंभू चे पाणी अखेर २० वर्षांनी गार्डीत पोहोचले ….
साळशिंगेची हद्द ओलांडून गार्डी हद्दीत पाण्याने प्रवेश करताच गार्डीकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ज्या क्षणाची आम्ही डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होतो, तो क्षण आज आला. जणू सोनियाचा दिनू आज अमृते पाहिला अशी स्थिती गार्डीतल्या प्रत्येकाची झालेली आहे. अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कालव्यातून पाणी वेगाने पुढे जात आहे. कुणी दुचाकीवरून, कुणी चार चाकी गाडीतून, कुणी पळतपळत तर कुणी अक्षरश: उड्या मारत पाण्याबरोबर पळत निघाले होेते.
 Dainik Pudhari 29/23/2016.

Friday 4 March 2016

बारमाही माणगंगा अभ्यास पथकाची टीका

पाणी पोहोचून सुद्धा आटपाडी तालुक्यांतील शेतकरी 

टेंभू च्या पाण्यापासून वंचित …

 बारमाही माणगंगा अभ्यास पथकाची टीका. 


Tembhu Update ....


3/03/2016

Saturday 27 February 2016

Tembhu L .I. S. Update ....26th Feb.2016


Tembhu L .I. S. Update ....26th Feb.2016

Only in Pudhari News Paper.


For More Details Watch Out Facebook Page... 


Failure Of Tembhu Water Lifting Scheme 


& my Blog 

http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/ 

Daily Pudhari

26th Feb.2016

Wednesday 24 February 2016

Tembhu @ 5h Stage .... MLA Anilrao Babar's Statement

                                 

    




























Tembhu @ 5h Stage .... MLA


Anilrao Babar's Statement


Daily Pudhari -24/02/2016

Tuesday 16 February 2016

टेंभू चे पाणी मिळणार कधी ? आवर्तनाचे पैसे भरतो , पण पाणी द्या .आटपाडी , सांगोला तालुक्यातील लोकांची मागणी…

टेंभू चे पाणी मिळणार कधी ? आवर्तनाचे पैसे भरतो , 
 

पण पाणी द्या. आटपाडी , सांगोला तालुक्यातील लोकांची मागणी… 


आता खरं तर अशा परिस्थितीत राज्य सरकारला 

कोर्टात खेचायची वेळ आली आहे पण कोण करणार ते ?


Daily Sakal - Dt. 17/02/2016.

टेंभू च्या घाणंद एस्क्प्रेस कालव्याला वेजेगावओढ्याजवळ गेट करा

टेंभू च्या घाणंद एस्क्प्रेस कालव्याला वेजेगाव  

ओढ्याजवळ गेट करा ; बाबासाहेब मुळीक 


जलव्यवस्थापन समितीची जिल्हाधिकार्यांच्या कडे 

मागणी यांची 

Daily Pudhari , Date - 17/02/2016.

Sunday 14 February 2016

टेंभू ला येत्या अर्थ संकल्पात १५० कोटी द्या : बाबासाहेब मुळीक यांची मागणी .

टेंभू ला येत्या अर्थ संकल्पात १५० कोटी द्या :
बाबासाहेब मुळीक यांची मागणी . 
Daily Pudhari - 14/02/2016

भाग्यनगर तलावातले साडे सोळा दश लक्ष घन फुट पाणी म्हणे उडून गेले…

कोणी कितीही आणि काहीही म्हणू देत 


पण टेंभू योजनेत जी काही अनागोंदी माजली आहे ती 

एक जागरूक पत्रकार म्हणून 


मी चव्हाट्यावर आणणारच … 


वाचत रहा 

http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/


 टेंभू च्या अधिकारयांचा आणखी एक प्रताप 
भाग्यनगर तलावातले पाणी म्हणे उडून गेले… 
भाग्यनगर तलावातल्या ऐन हिवाळ्यात ५५ दिवसात 
चक्क साडे सोळा दश लक्ष घन फुट पाण्याचे  बाष्पीभवन झाले. 
  तलावाखाली जाळ लावला होता कि काय या महाभागांनी ???