लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday 18 March 2013

केवळ ६ कोटीत पाणी उताराने आटपाडीत पोहोचू शकेल-माजी सरपंच परशुराम गायकवाड

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी बलवडी (खानापूर) च्या पठारावरून उतरणे आटपाडीत जाऊ शकेल असा दावा माजी सरपंच परशुराम गायकवाड यांनी केला आहे. त्यासाठी टेंभू योजनेचा टप्पा क्रमांक ३ ब आणि ४ वेजेगाव आणि टप्पा क्रमांक ५ भूड पंपग्रहाचे काम जर महाराष्ट्र शासनाचे अधिकारी १७ कोटीत पूर्ण होणार असेल तर केवळ ६ कोटीत पाणी उताराने आटपाडीत पोहोचू शकेल.