लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Tuesday 2 April 2013

खानापूर घाटमाथ्याला कोणी वाली उरला आहे का ?

टेंभू योजनेचा गोरेवाडी, कचरेवाडी हे  कालवे रद्द होणार किंवा नाही या बाबत टेंभू ' चे जनक  माजी आमदार अनिल बाबर आणि विद्यमान आमदार सदाशिव पाटील किंवा अन्य कोणीही नेता यावर बोलायला तयार नाही. आता तर खानापूर घाटमाथ्याला कोणी वाली उरला आहे का नाही असा प्रश्न पडावा अशी अवस्था निर्माण झाली आहे.