लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Monday 13 April 2015

आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ?



आता तासगावचा संबंधच नाही ; मग कालव्याचे नाव खानापूर - तासगाव कां ?
खानापूर - तासगाव कालवा … टेंभू योजनेच्या सुरुवातीच्या आराखड्यात हा कालवा १०६ किलो मीटर अंतराचा होता. परंतू मध्येच गेल्या दोन वर्षा पूर्वी तासगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देण्यासाठी राज्य सरकारने विसापूर - पुणदी उपसा सिंचन योजना निर्माण केली. टेंभू योजनेच्या टप्पा क्रमांक २ नंतर खंबाळे बोगद्यातून पाणी सुर्ली घाटावर आल्यानंतर आरफळ कालव्यात टेंभू योजनेचे पाणी उताराने सोडून बंदिस्त पाईप लाईन द्व्यारे पेड तलावापर्यंत आणण्याचे नियोजन विसापूर - पुणदी उपसा सिंचन या योजनेत  आहे. परंतू माहुली नंतर  टप्पा क्रमांक ३ मध्ये जो खानापूर -तासगाव कालवा होता तो ४२ किलोमीटर अंतरापर्यंतच मर्यादित करण्यात आला. त्या मुले आता तासगावचा आणि या कालव्याचा अर्थअर्थी संबंध उरलेला नाही…. या कालव्याचे सध्या काय सुरु आहे ? ते प्रत्यक्ष वाचा….