लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Thursday 28 November 2013

रविवारपासून (तारीख- १ डिसेंबर 2013 ) आणखी एक मोठा लढा ,

1993 पासून आतापर्यंत अंतहीन सुरु असलेले आंदोलन, एक चळवळ आपण पहिली आणि पाहत आहोत ,  आता उद्याच्या रविवारपासून (तारीख- १ डिसेंबर 2013 ) आणखी एक मोठा लढा , मोठी चळवळ उभी राहत आहे. ज्यात परत एकदा 12-13 दुष्काळी तालुके एकत्र करण्यात येणार आहेत. हे काही आपल्याला नवीन नाही. पाण्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत. पण या चळवळीला तरी अंत असावा,  हे आंदोलन तरी अखेरचे ठरावे, एव्हढीच अपेक्षा…. विजय लाळे / विटा.

Tuesday 26 November 2013

पाल खेचून मगर केल्या प्रमाणे टेंभू योजना वाढवण्याचे धंदे सुरु

पाल खेचून मगर केल्या प्रमाणे टेंभू योजना वाढवण्याचे धंदे सुरु आहेत. हा सगळा प्रकार म्हणजे लोकांच्या डोळ्यात केवळ धूळफेक करण्यासारखे आहे. जेवढी गावे वाढतील, जेवढे लाभक्षेत्र वाढेल तेवढे पाणी उपलब्ध आहे का ? तेवढा निधी द्यायला सरकारकडे पैसे आहेत का ? शिवाय जितक्या वेळा लिफ्ट वाढेल तितके पाणी महाग होत जाणार आहे. मग अव्यवहार्य म्हणून मधूनच हि योजना कायमची बंद पडण्याचीहि शक्यता आहे आणि या सगळ्या गडबडीत ज्याना टेंभू व्यतिरिक्त अन्य योजनांचे पाणी
मिळते आहे किंवा मिळणार आहे अगर भविष्यात मिळू शकेल त्याच भागात परत टेंभूचे पाणी फिरेल. आणि मुळात ज्याना पाणी द्यायचे नियोजन होते, ते लोक, तो भाग कोरडाच राहण्याची शक्यता आहे. नाहीतरी गेल्या 20 वर्षात तेच झाले आहे.
लोकांनीच आता याचा जाब विचारायला पाहिजे.
इनामदार म्याडम यांची तळमळ आणि प्रयत्न प्रामाणिक जरूर असतील. त्यांचे आंदोलन आणि दिशा जरी बरोबर असली तरी त्यांनी संपूर्ण माहिती घेवूनच अभ्यासांती या लढ्यात उतरावे असे एक पत्रकार म्हणून माझे मत आहे - विजय लाळे , विटा.
For more details ...visit the BLOG named
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/

Thursday 21 November 2013

आगामी हिवाळी अधिवेशनात टेंभू उपसा जल सिंचन योजनेला सुधारित मान्यता देणार

********   हसावे का रडावे ?*****
आगामी हिवाळी अधिवेशनात टेंभू उपसा जल सिंचन योजनेला सुधारित मान्यता देणार …
जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी आटपाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार याना  दिले आश्वासन.
हि बातमी वाचली अन हसावे का रडावे ते कळेना !
सरकार दुष्काळग्रस्तांची किती आणि कशा प्रकारे चेष्टा करते हे परत एकदा दिसले. हि सुधारित मान्यता म्हणजे नेमक्या कुठल्या वर्षाच्या खर्चाच्या आधारावर देणार आहेत. टेंभू योजना पहिल्यांदा मंजूर झाली त्यावेळी या योजनेचा खर्च केवळ 700 कोटी रुपये होता. त्यानंतर योजना कृष्णा खोरे महामंडळा अंतर्गत समाविष्ट केली, आणि प्रत्यक्ष मान्यता मिळाली तेंव्हा योजनेचा खर्च 1हजार 400 कोटी रुपयांवर गेला. त्यानंतर 2 हजार 100 कोटी , मग 2008 सालात 3 हजार 500 कोटी, त्यानंतर पुढे 2010-11 मध्ये 4 हजार कोटी रुपये असा खर्च वाढत गेला आहे.  गेल्या दोन वर्षात सिमेंट, स्टील, डीझेल, मजुरी, पगार यांचा खर्च दुपटीने वाढला आहे. तेंव्हा आता कुठल्या सुधारित मान्यतेच्या गोष्टी सुरु आहेत. आज पर्यंत निधी नाही म्हणून कामे बंद होती, त्यानंतर निधी आल्यावर आता पाऊस पडल्याने कालव्यात पाणी आहे म्हणून कामे बंद,  आता  सुधारित मान्यतेच्या नावावर वेळ वाया चालला आहे.
आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, टेंभूत आणखी असंख्य गावे घातली जाणार आहेत. तसे प्रयत्न काही मंत्री आणि नेत्यांकडून सुरु आहेत. त्यातच या भागातला  दुष्काळ घालवण्यासाठी जणू टेंभू हिच एकमेव योजना आहे, त्यानंतर दुसरी कुठलीही योजना होणार नाही, किंवा आम्ही करू देणार नाही, अशी भीती इथल्या लोकाना घालून पाल खेचून मगर केल्या प्रमाणे टेंभू योजना वाढवण्याचे धंदे सुरु आहेत. हा सगळा प्रकार म्हणजे लोकांच्या डोळ्यात केवळ धूळफेक करण्यासारखे आहे. जेवढी गावे वाढतील, जेवढे लाभक्षेत्र वाढेल तेवढे पाणी उपलब्ध आहे का ? तेवढा निधी द्यायला सरकारकडे पैसे आहेत का ? शिवाय जितक्या वेळा लिफ्ट वाढेल तितके पाणी महाग होत जाणार आहे. मग अव्यवहार्य म्हणून मधूनच हि योजना कायमची बंद पडण्याचीहि  शक्यता आहे आणि या सगळ्या गडबडीत ज्याना टेंभू व्यतिरिक्त अन्य योजनांचे पाणी
मिळते आहे किंवा मिळणार आहे अगर भविष्यात मिळू शकेल त्याच भागात परत टेंभूचे पाणी फिरेल. आणि मुळात ज्याना  पाणी द्यायचे नियोजन होते, ते लोक, तो भाग कोरडाच राहण्याची शक्यता आहे. नाहीतरी गेल्या 20 वर्षात तेच झाले आहे.
 लोकांनीच आता याचा जाब विचारायला पाहिजे.
इनामदार म्याडम यांची तळमळ आणि प्रयत्न प्रामाणिक जरूर असतील. त्यांचे आंदोलन आणि दिशा जरी बरोबर असली तरी त्यांनी संपूर्ण माहिती घेवूनच अभ्यासांती  या लढ्यात उतरावे असे एक पत्रकार म्हणून माझे मत आहे - विजय लाळे , विटा.


Tuesday 19 November 2013

टेंभू च्या मूळ आराखड्यातच चुकीचे लाभक्षेत्र : डॉ. पाटणकर

महाराष्ट्रातल्या सगळ्या पाणी योजना या मूळ आराखड्या प्र
माणेच करा - असा आदेश थेट राज्यपाल के शंकर नारायनन राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे. त्यामुळे टेंभू योजना पुन्हा एकदा वादात…
टेंभू च्या मूळ आराखड्यातच चुकीचे लाभक्षेत्र : डॉ. पाटणकर.
आणखी चार गावे वाढल्याने काय फरक पडणार ?
आपल्या टेंभू योजनेच्या बाबत आता आणखी हे नवीनच  काय चाललय ?…पहा फक्त
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in वर

मंत्र्यांनो आता तरी सिंचन योजना पूर्ण करा : किसान सभेचे अरुण माने


सगळ्या पाणी योजना या मूळ आराखड्या प्रमाणेच करा - राज्यपाल

महाराष्ट्रातल्या सगळ्या पाणी योजना या मूळ आराखड्या प्रमाणेच करा - असा आदेश थेट राज्यपाल के शंकर नारायनन राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे. त्यामुळे टेंभू योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात अडकली आहे.
आपल्या टेंभू योजनेच्या बाबत आता आणखी हे नवीनच  काय चाललय ?…पहा फक्त
http://tembhuchishwetpatrika.blogspot.in वर

Saturday 16 November 2013

Thursday 14 November 2013

टेंभू योजनेत आता आणखी एक लिफ्ट वाढणार… जय हो

 घाटनांद्रेसाठी आणखी एका लिफ्ट ची गरज … आर आर पाटील
टेंभू योजनेत आता आणखी एक लिफ्ट वाढणार… जय हो !!!!!

Monday 11 November 2013

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...: आम्ही आहोत भगीरथाचे वारस = देशातला हा आणखी एका भगीरथाच्या वारसदाराची हि कहाणी … पहा आणि विचार करा… आपणही असे करू शकतो.… फक्त इच्छाशक्ती...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...

Barmahi Manganga (AWARD WINNING BLOG): हिमालयाच्या कुशीत वसलेल्या लडाखमध्येही दुष्काळ का ...: आम्ही आहोत भगीरथाचे वारस = देशातला हा आणखी एका भगीरथाच्या वारसदाराची हि कहाणी … पहा आणि विचार करा… आपणही असे करू शकतो.… फक्त इच्छाशक्ती...

Friday 8 November 2013

टेंभूचे पाणी नाही नवीन योजनाही नाही :

टेंभूचे पाणी नाही नवीन  योजनाही नाही :
खानापूर - आटपाडी तालुक्यांवर अन्यायाची परंपरा सुरूच
खानापूर आणि आटपाडी हे तालुके दुष्काळी राहिले तरच उरलेल्या सांगली जिल्ह्यात टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत निधी मिळेल, जर हे दोन्ही तालुके दुष्काळ मुक्त झाले किंवा या तालुक्यांना पाणी मिळाले तर जिल्ह्याला टंचाई निधी मिळणार नाही. त्यामुळे दुष्काळाच्या नावाखाली या दोन तालुक्यांना चार छावणी, डेपो आणि तैंकर द्यायचे आणि म्हैसाळ, ताकारी आणि  टेंभूच्या लाभ दारी भागातल्या उपसा सिंचन योजनांची बिले या टंचाई निधीतून भरायची असा सर्रास उद्योग जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे, नाहीतर टेंभू चे पाणी खानापूर आटपाडीला लवकर न देण्या मागे दुसरे कारण तरी कोणते आहे ?


Saturday 2 November 2013

ढालगावसह आठ गावे 'टेंभू'त समाविष्ट

ढालगाव : ढालगावसह परिसरातील आठ गावांचा समावेश टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात झाला आहे. याबाबतचे पत्र कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालकांना प्राप्त झाले. त्याची प्रत आज माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत हाक्के यांना मिळाली. त्यानंतर येथील कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली.
ढालगाव, शिंदेवाडी, कदमवाडी, ढोलेवाडी, चोरोची, जांभूळवाडी, चुडेखिंडी, दुधेभावी या आठ गावांचा टेंभू प्रकल्पांतर्गत व कवठेमहांकाळ कालव्याच्या लाभक्षेत्रात समावेश करण्याबाबत शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. तशा आशयाचे पत्र नुकतेच कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना प्राप्त झाले आहे. त्याची प्रत आज चंद्रकांत हाक्के यांनी कार्यकर्त्यांना दाखवताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली व आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी जि. प. सदस्य चंद्रकांत हाक्के, कुमार पाटील, बापूसाहेब खुटाळे, उपसरपंच अरविंद स्वामी, संजय पाटील, दौलत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ढालगावसह परिसरातील गावांना व घाटमाथ्यालाही पाणी मिळावे यासाठी सर्वपक्षीय आंदोलन केल्यानंतरच गृहमंत्री आर. आर. पाटील या भागाला पाणी देण्याचे अभिवचन दिले होते. ते पूर्ण झाल्याची भावना यावेळी हाक्के यांच्यासह कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. (वार्ताहर)ढालगावसह आठ गावे 'टेंभू'त समाविष्ट