लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Tuesday 26 April 2016

टेंभू चे पाणी अग्रणीत सोडायचीच घाई का ? कशासाठी ?

खानापूर घाट माथ्याला टेंभू च्या ४ आणि ५ व्या टप्प्यांचा काय फायदा ?
जो पर्यंत कचरेवाडी आणि गोरेवाडी हे दोन कालवे पूर्ण होत नाहीत , 
तसेच  अद्याप टेंभू च्या लाभ क्षेत्रा बाहेर असलेली उर्वरित १८ गावे टेंभू योजनेत समाविष्ट होत नाहीत तो पर्यंत 
खानापूर घाट माथ्याला टेंभू च्या ४ आणि ५ व्या टप्प्यांचा काय फायदा ?
टेंभू चे पाणी अग्रणीत सोडायचीच घाई का ? कशासाठी ? हे आता सगळ्या लोकाना समजायला लागले आहे …