लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday 8 November 2013

टेंभूचे पाणी नाही नवीन योजनाही नाही :

टेंभूचे पाणी नाही नवीन  योजनाही नाही :
खानापूर - आटपाडी तालुक्यांवर अन्यायाची परंपरा सुरूच
खानापूर आणि आटपाडी हे तालुके दुष्काळी राहिले तरच उरलेल्या सांगली जिल्ह्यात टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत निधी मिळेल, जर हे दोन्ही तालुके दुष्काळ मुक्त झाले किंवा या तालुक्यांना पाणी मिळाले तर जिल्ह्याला टंचाई निधी मिळणार नाही. त्यामुळे दुष्काळाच्या नावाखाली या दोन तालुक्यांना चार छावणी, डेपो आणि तैंकर द्यायचे आणि म्हैसाळ, ताकारी आणि  टेंभूच्या लाभ दारी भागातल्या उपसा सिंचन योजनांची बिले या टंचाई निधीतून भरायची असा सर्रास उद्योग जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे, नाहीतर टेंभू चे पाणी खानापूर आटपाडीला लवकर न देण्या मागे दुसरे कारण तरी कोणते आहे ?