लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Tuesday 26 May 2015

एकूणच टेंभू चे गणितच चुकलेय

उद्या कधी भविष्यात खासगीकरणातून पूर्ण करायचे ठरले तरी टेंभू योजनेत कोणीही पैसे गुंतवणार नाही…  
एकूणच टेंभू चे गणितच कसे चुकलेय ? ते वाचा… 

Sunday 24 May 2015

Wednesday 20 May 2015

टेंभू प्रकल्पाने चार हजार कोटी पार केले 20/5/2015

टेंभू प्रकल्पाने चार हजार कोटी पार केले …
 दैनिक लोकमत. सांगली २०/५/२०१५

टेंभू ला ५०० कोटी रुपये द्या ; भारत पाटणकर

टेंभू ला ५०० कोटी रुपये द्या ; भारत पाटणकर यांची नवी मागणी …
साला हा माणूस पैसे मागण्या शिवाय काय बोलतच नाय !!! 

पाणी योजनांचे खासगी करण-


 पाणी योजनांचे खासगी करण- 
खासदार संजय पाटील यांच्या पाणी योजनांच्या खासगी करणाच्या पर्यायावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया …. 

Sunday 17 May 2015

आता हे आणखी एक गाजर : खासगीकरणातून या योजना पूर्ण करणार



आता हे आणखी एक गाजर : 
ताकारी , टेंभू , म्हैसाळ योजना निधी अभावी पूर्ण होत नाहीत त्यामुळे आता खासदार संजय पाटील यांनी खासगीकरणातून या योजना पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली आहे. 
मुळात ज्यात फायदा आहे किंवा भविष्यात होण्याची शक्यता आहे अशा गोष्टीत कार्पोरेट किंवा खासगी कंपन्या पैसे गुंतवतात. या पाणी योजना मध्ये पैसे गुंतवून त्या कंपन्यांचा फायदा काय ? हा झाला एक प्रश्न…. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या योजना व्यवहार्य आहेत का ? हजारो कोटी रुपये घालून जर शेवटी जनतेचा रोषच पदरात पडणार असेल तर या योजनांत कोण पैसे घालील ?

Thursday 7 May 2015

टेंभू च्या पाण्यासाठी सांगलीत सोमवारी मोर्चा Dt. 07/05/2105 (सौजन्य - दैनिक लोकमत )

टेंभू च्या पाण्यासाठी सांगलीत सोमवारी मोर्चा : पाणी संघर्ष चळवळीचा इशारा : जिल्हाधिकार्याना निवेदन 
Dt. 07/05/2105 (सौजन्य - दैनिक लोकमत )
टेंभू चे पाणी मिळावे यासाठी हे आणखी एक आंदोलन ; 
आधी क्रांतिवीर नागनाथअण्णा  नायकवडी आणि आता श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातील लोक टेंभू योजनेचे पाणी आम्हाला मिळाले पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत…. गेली १८ -२० वर्षे हेच सुरु आहे…. चळवळ , आंदोलन, मोर्चा आणि परत चळवळ …. मात्र काही एक फरक पडत नाही असे का होत आहे ??? टेंभू योजनेचे पाणी नक्की आज कुणाला मिळालेय ? भविष्यात आणखी कुणाला मिळणार आहे ? कुणाला मिळणार नाही ? तसेच किती गावांना कधीच मिळणार नाही ? अखेर काय आहे टेंभूचे वास्तव …. वाचा फक्त  " श्वेतपत्रिका टेंभूची " अर्थात " व्हाईट पेपर ऑफ टेंभू " 
जाणून घेण्यासाठी   http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/...इथे क्लिक करा