लोकांना मूर्ख बनवणे सोपे

लोकांना मूर्ख बनवणे सोपे
लोकांना मूर्ख बनवणे सोपे -अमेरिकन लेखक मार्क ट्वेन... लोकांना मूर्ख बनवणे सोपे असते पण त्यांना मूर्ख बनवले गेले आहे हे पटवून देणे कठीण काम आहे असं मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा अमेरिकन लेखक एके ठिकाणी म्हणतो… टेंभू योजनेबाबत असेच म्हणावे लागतेय… राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी मिळून टेंभू योजनेचे पार वाटोळे करून ठेवले आहे. हेच सत्य आहे, परंतू हि वस्तुस्थिती लोकांना पटवून देणे हे काम खरोखरीच कठीण दिसतंय…

Friday 29 March 2013

उपसा जलसिंचन प्रकल्पांचे काय होणार ?

अनेक वर्षांपासून  उपसा जलसिंचन प्रकल्पांचे घोंगडे भिजत पडलेले आहे. मेरी चे विजय पांढरे यांनी हे सर्वच उपसा सिंचनाचे प्रकल्प हे उपयोगाचे ठरणार नाहीत, ते अव्यवहार्य आणि अतार्किक आहेत असे मत जाहीरपणे मांडून अंतिमतः ते त्वरित बंद केले पाहिजेत असे सुचवले आहे. या उपसा सिंचन प्रकल्पांबाबत आता अनेक टीका,  मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. ज्या लोकांसाठी ज्या भागांच्यासाठी हे प्रकल्प आखलेत ते लोक, तो भाग आजही दुष्काळी आहे., कोरडेच आहेत.  शेवटी  काय होणार या प्रकल्पांचे ?  पूर्ण होतील का ? झालेच तर कधी होणार ? अखेर काय घडेल
?...या सगळ्या प्रश्नांची रोखठोक उत्तरे, आणि राजकारणा पलीकडे जावून केलेला अभ्यास आणि माझी परखड मते ......
श्वेतपत्रिका टेंभूची.....आजपासून दररोज वाचा http://tembhuchishwetpatrika.blogspot.in/ 

New Proposal Of Tembhu L.I.S.

टेंभू जलउपसा सिंचन  योजनेचे पाणी आटपाडीला मिळण्यासाठी तब्बल अजून एका वर्षाचा कालावधी आणि २०० कोटी रुपयांची गरज आहे. हे पाणी लवकरात लवकर आणि कमी पैश्यात आटपाडीत नेण्याच्या दृष्टीने विटा विभागीय पत्रकार संघाने एक योजना राज्य शासना समोर मांडली आहे.  माहुली पंपगृहाच्या अलीकडे १ किलो मीटर अंतरावर २७ कि. मी.  चा बोगदा काढून टेंभू चे पाणी उताराने केवळ १६. ५० कोटी रुपयांमध्ये आटपाडीत पोहोचू शकेल असा  हा प्रस्ताव आहे. तोच हा
प्रस्ताव…